बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांना त्यांच्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जाते. त्या अनेकदा बोल्ड विधाने करुन खळबळ उडवून देतात. त्या आपल्या आयुष्यातील प्रत्येक सत्य न डगमगता सांगतात आणि आपल्या चुकाही धैर्याने स्वीकारतात. त्यांचा स्पष्टवक्तेपणा त्याच्या चाहत्यांना खूप आवडतो.
नीना गुप्ता सध्या ‘मस्त में रहने का’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून नीना गुप्तासोबत जॅकी श्रॉफच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे. दरम्यान, नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या आयुष्यातील आणखी एक सत्य शेअर केले. त्या म्हणाल्या, त्यांना मोफत जेवण मिळावे म्हणून त्या संघर्षाच्या दिवसांत पृथ्वी थिएटरच्या कॅफेमध्ये काम करायची.
मुलाखतीत नीना गुप्ता यांनी त्या दिवसांची आठवण काढली, जेव्हा त्या तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिल्लीहून मुंबईत आली होती आणि इथे आल्यानंतर त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता. “जेव्हा मी मुंबईत आले, तेव्हा मी माझ्या बॉयफ्रेंडलाही सोबत आणले होते, कारण त्यावेळी एकट्याने एवढे मोठे पाऊल उचलण्याची हिंमत माझ्यात नव्हती.”
नीना गुप्ता पुढे म्हणाल्या, “मी मुंबईत आल्यावर पृथ्वी कॅफेमध्ये स्वयंपाक करायचे, जेणेकरून मला तिथे मोफत जेवण मिळेल. माझा बॉयफ्रेंड माझ्यावर ओरडायचा. तो म्हणायचा- लाज बाळग, तू मुंबईत मोलकरीण बनण्यासाठी आली आहेस का, तू हे सगळं करायला आली आहेस का?”
नीना गुप्ता पुढे म्हणाल्या, “माझा प्रियकर त्याच्या सिगारेटसाठीही माझ्याकडे पैसे मागायचा, तरीही त्याच्यात इतकं हिंमत होती की तो मला काम करायला लाजवेल, मी आधीही सगळ्यांना सांगत होती, आजही सांगते पैसे मागताना लाज वाटली पाहिजे पण काम मागताना नाही.
नीना गुप्ता म्हणाल्या की, त्या कोणत्याही प्रकारचे काम करण्यास लाजत नाही, “जेव्हा आम्ही NSD (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) मध्ये होतो तेव्हा आम्ही सर्व काही करायचो. मजले साफ करण्यापासून ते प्रत्येक काम. आम्ही सर्व कामे घरीच करायचो. तेही आम्ही स्वतः करायचो. माझी आई गांधीवादी होती, त्यामुळे आमच्या घरी नोकर नव्हते, त्यामुळे सर्व कामे आम्हालाच करावी लागत होती. लहानपणापासून मला कोणतेही काम करायला लाज वाटली नाही.”
25 अप्रैल को आरती सिंह ने दीपक चौहान संग सात फेरे लिए. दोनों की अरेंज…
लवबर्डस बिपाशा बसु और करण सिंह ग्रोवर की शादीशुदा जिंदगी को 8 साल बीत गए…
आरती सिंह की शादी की जितनी चर्चा थी, उतनी ही चर्चा इस बात की भी…
बुकींगचा विक्रम नोंदविला आहे. या चित्रपटाच्या तिकिटांचे आणि शोंचे हे आरक्षण ‘बुक माय शो’वर आरक्षण…
दुबईहून मुंबईत परतलेल्या राखी सावंतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता एक आवाहन केलं आहे. ती म्हणाली…
गरजू लोकांचा कैवारी बनलेल्या अभिनेता सोनू सूदने ट्विट करून आपले व्हॉट्सॲप खाते बंद करण्यात आल्याचे…