तब्बू ही सध्या तिच्या क्रु या चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे. दरम्यान तब्बूच्या एका सुपरहिट चित्रपटाच्या संदर्भात एक बातमी समोर आली आहे. तब्बूची प्रमुख भूमिका असलेला अन ज्या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार देखील पटकावला होता त्या चित्रपटाचा आता २४ वर्षांनंतर सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘चांदनी बार’ हा तो चित्रपट आहे.
२०१८ पासून ‘चांदनी बार’ या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा सुरू होती. अखेर मोहन आजाद यांनी या सिक्वेलची घोषणा केली आहे. पण यात एक मोठा बदल होणार आहे. ते म्हणजे ‘चांदनी बार’ या चित्रपटाच्या सिक्वेलच्या दिग्दर्शनाची धुरा मधुर भांडारकर नाही तर मोहन आजाद यांच्याकडे असणार आहे. २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘चांदनी बार’ चित्रपटाची पटकथा मोहन यांनी लिहिली होती.
‘चांदनी बार’ चित्रपटात अभिनेत्री तब्बूसह अतुल कुलकर्णी, अनन्या खरे, राजपाल यादव, मीनाक्षी साहनी आणि विशाल ठक्कर महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते. आता हेच कलाकार सिक्वेलमध्ये पाहायला मिळणार की नाही, हे गुलदस्त्यात आहे. पण सिक्वेलच्या चित्रपटाची पटकथा जवळपास पूर्ण झाली असून कास्टिंग देखील अंतिम टप्प्यात आहे. यानंतर वर्षाच्या मध्यावर निर्माते चित्रपट चित्रीकरण सुरू करण्यासाठी तयार आहेत.
दरम्यान, ‘चांदनी बार’च्या सिक्वेलबाबत मोहन आजाद म्हणाले की, या चित्रपटाचे निर्माते आर. मोहन यांनी ‘चांदनी बार’च्या सिक्वेलसाठी खूप आधीच इच्छा व्यक्त केली होती. आम्ही सिक्वेलच्या कथेबद्दल खूप गोंधळलो होतो. पण आता आमची कथा जवळपास लिहून झाली आहे, याचा मला आनंद आहे. ‘चांदनी बार’चा सिक्वेल जबरदस्त बनवला जाणार आहे. येत्या वर्षात आपण ‘चांदनी बार’च्या त्याच यशाची पुनरावृत्ती करू, अशी मला आशा आहे. या चित्रपटाचा सिक्वेल डिसेंबर २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.
मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. भाग्यश्री हिने सोशल मीडियावर…
वाढता असह्य उन्हाळा, घामाच्या धारा नि थकलेलं शरीर ह्यामुळे जीव अगदी नको नकोसा होतो. परंतु…
गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या डेटिंगच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत होत्या.…
Ever thought that someday you might need medical treatment for having sex? Hypersexuality issomething very…
रेटिंगः *** हिंदी सिनेमा में खेल पर बहुत कम फिल्में बनी हैं, लेकिन यह भी…
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ऊन सावली' या चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून…