Uncategorized

करण जोहरचे काजोल आणि करीनाशी झालेले मोठे वाद, एकमेकांचा चेहराही न बघण्याचा घेतलेला निर्णय(When Karan Johar had Dispute with Kajol and Kareena Kapoor, He broke Relations with Both Actress)

करण जोहर हा असा एक बॉलिवूड चित्रपट निर्माता आहे जो इंडस्ट्रीतील बहुतेक सेलिब्रिटींसोबत चांगला बाँडिंग शेअर करतो. किंग खान, काजोल आणि करीना कपूर यांसारखे सेलिब्रिटी त्याचे सर्वात जुने आणि चांगले मित्र आहेत. विशेषत: काजोल आणि करीनासोबतची त्याची बॉन्डिंग सर्वांनाच ठाऊक आहे, पण चित्रपट निर्मात्याच्या आयुष्यात एक असा टप्पा आला जेव्हा त्याचा करीना कपूर आणि काजोलसोबत वाद झाला. प्रकरण इतके बिघडले की करणने त्या दोघांसोबतचे नाते संपवले. याचा खुलासा खुद्द करण जोहरने ‘कॉफी विथ करण 8’ च्या एका एपिसोडमध्ये केला होता. चला जाणून घेऊया ही रंजक गोष्ट सविस्तर…

चित्रपट निर्माता करण जोहरने अलीकडेच त्याच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण 8’ च्या एका एपिसोडमध्ये काजोल आणि करीना कपूरसोबतच्या वादाबद्दल उघडपणे सांगितले. काजोल आणि करीना या दोन जवळच्या मैत्रिणींसोबत कसा वाद झाला हे त्याने सांगितले, हा वाद इतका होता की त्याने बोलणेच बंद केले होते.

करीना कपूरवरील नाराजीबद्दल बोलताना करणने सांगितले की, जेव्हा करीनाने त्याच्या ‘कल हो ना हो’ चित्रपटाऐवजी ‘मैं प्रेम की दिवानी हूं’ निवडला तेव्हा तो खूप दुखावला गेला. त्यावेळी तो इतका दु:खी झाला की त्याने बराच वेळ अभिनेत्रीशी बोलणेही केले नाही.

करणने पुढे सांगितले की, तो जवळपास दीड वर्ष करीना कपूरशी बोलला नाही. दोघांमधील वादाचे कारण चित्रपट होता. मात्र, जेव्हा करणच्या वडिलांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले तेव्हा करिनाने स्वताहून पुढाकार घेऊन बोलायला सुरुवात केली. त्यावेळी करण गप्प बसला. त्याच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा करीना बँकॉकमध्ये होती आणि त्यानंतरही दोघे भेटले नाहीत.

मात्र, शूटिंग संपवून करीना परत आल्यावर ती करणच्या घरी गेली, जिथे दोघांनी रात्रभर गप्पा मारल्या. या संवादानंतर दोघांमधील सर्व रुसवा दूर झाला आणि ते पूर्वीप्रमाणे मित्र झाले. करणने भांडणानंतर ठरवले होते की तो करीनाशी पुन्हा कधीच बोलणार नाही, पण आता त्यांच्या मैत्रीत सर्व काही ठीक आहे.

करणने त्याच्या शोमध्ये काजोलसोबतची मैत्री आणि तिच्यासोबत झालेल्या भांडणाचा खुलासाही केला. करणने सांगितले की, काजोलसोबत त्याचे नेहमीच भावनिक बंध होते आणि जेव्हा त्यांच्यात भांडण झाले तेव्हा त्यांना वाटायचे की ते पुन्हा कधीच एकत्र राहणार नाहीत. या वादानंतर दोघेही जवळपास दोन वर्षे बोलले नाहीत, पण जेव्हा करणची जुळी मुले या जगात आली तेव्हा त्याने आपल्या मुलांचे फोटो काजोलला पाठवले.

करण म्हणाला- मला आठवते की जेव्हा माझ्या मुलांचा जन्म झाला तेव्हा मी काजोलला यश आणि रुहीचे फोटो पाठवले होते. मी असेही म्हणालो की तुला उत्तर देण्याची गरज नाही, परंतु मला सांगायचे आहे की माझी मुलं अशी दिसतात. करणच्या मेसेज उत्तर देताना काजोल म्हणाली की ती अजूनही प्रेमाने भरलेली आहे. करणने सांगितले की, एका महिन्यानंतर काजोलने त्याला मेसेज केला आणि सांगितले की, माझा वाढदिवस आहे, पण तुला येण्याची गरज नाही. मात्र, काजोलच्या मेसेजनंतर करण तिथे पोहोचला आणि दोघांनी एकमेकांना प्रेमाने मिठी मारली.

, काजोल आणि करणमध्ये ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि अजय देवगणचा ‘शिवाय’ चित्रपटाच्या क्लॅशवरून वाद झाला होता. काजोलसोबतच्या त्याच्या वर्षानुवर्षांच्या मैत्रीतील दरीबद्दल, करणने त्याच्या आत्मचरित्रात लिहिले होते की, मी तिला माझा एक तुकडाही द्यायला आवडणार नाही, कारण तिने 25 वर्षांच्या माझ्या भावना एका क्षणात मारून टाकल्या. ती माझ्या लायक आहे असे मला वाटत नाही. मात्र, दोन वर्षांच्या भांडणानंतर अखेर त्यांच्या मैत्रीत पुन्हा बंध जुळला. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

5 डाइजेशन प्रॉब्लम्स, 25 होम रेमेडीज़ (5 Digestion Problems, 25 Home Remedies)

पेटदर्द, उल्टी, बदहज़मी और एसिडिटी जैसी डाइजेशन संबंधी प्रॉब्लम्स से यदि आप भी परेशान रहते…

April 22, 2024

यावर्षी नाही दिसणार मेट गाला इव्हेंटमध्ये प्रियांका चोप्राचा क्लासी लूक, अभिनेत्रीनेच सांगितले कारण (Priyanka Chopra Will Not Attend Met Gala 2024, Actress Reveals The Reason)

तिच्या ताज्या मुलाखतीत, प्रियांका चोप्राने खुलासा केला की ती या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये होणाऱ्या…

April 22, 2024

अभिनेता चिन्मय मांडलेकर याने यापुढे कधी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न साकारण्याचा घेतला निर्णय (Chinmay Mandlekar Trolled For Naming Son Jahangir)

चिन्मयनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करुन चिन्मयनं कॅप्शनमध्ये…

April 22, 2024
© Merisaheli