Entertainment Marathi

डोळेही उघडत नव्हते, चालता बोलताही येत नव्हतं… केबीसीमध्ये बिग बींनी आठवले ते महाभयंकर दिवस (Amitabh Bachchan had This Serious Illness, Remembering Painful Days, he said – I Could’nt Walk or Speak Properly)

मेगास्टार आणि बॉलिवूडचा बादशहा अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत अविरत काम करत आहेत. वयाच्या ८१ व्या वर्षीही बिग बी आपल्या उत्साहाने तरुण कलाकारांना स्पर्धा देतात. चित्रपटांमध्ये आपली कारकीर्द सुरू ठेवत असताना, बिग बी गेल्या अनेक वर्षांपासून ‘कौन बनेगा करोडपती’ शो होस्ट करत आहेत, सध्या ते ‘केबीसी 15’ होस्ट करत आहेत. अनेकदा चाहत्यांसह मजेदार किस्से शेअर करतात. शोमध्ये ते काही स्पर्धकांच्या भावना ऐकतात आणि काही वेळा आपल्या भावना सर्वांसोबत शेअर करतात. अलीकडेच बिग बींनी त्या दिवसांची आठवण काढली जेव्हा त्यांना चालता बोलता येत नव्हते.

‘KBC 15’ च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी एक किस्सा सांगितला, एकेकाळी त्यांना मायस्थेनिया ग्रॅव्हिस नावाच्या गंभीर आजाराने ग्रासले होते. त्या वेदनादायक काळाची आठवण करून देताना ते म्हणाले की, या आजारामुळे त्यांना बोलता येत नाही आणि चालणेही कठीण झाले होते. त्या कठीण काळात दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी खूप मदत केली होती.

अमिताभ बच्चन यांनी ही घटना सांगितली जेव्हा श्रीदेव वानखेडे नावाचा स्पर्धक त्यांच्या समोर हॉट सीटवर बसला होता. लाइफलाइनचा वापर करून श्रीदेवने 12 लाख 50 हजार रुपये काढले होते. त्याचवेळी श्रीदेव वानखेडे यांनी सांगितले की, अपघातामुळे ते अपंग झाले, त्यामुळे नैराश्येत गेले, परंतु पत्नी आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे ते त्या टप्प्यातून बाहेर येऊ शकले.

श्रीदेव वानखेडेची कहाणी ऐकून सगळेच भावूक झाले, मग बिग बींनाही त्यांच्या आयुष्यातील तो कठीण काळ आठवला, जेव्हा ते मायस्थेनिया ग्रॅव्हिस नावाच्या स्नायूंच्या आजाराचे बळी ठरले होते. त्याने सांगितले की, ते एका चित्रपटाचे शूटिंग करत असताना सेटवर अचानक बेशुद्ध पडले. वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना स्नायूंच्या विकाराशी संबंधित मायस्थेनिया ग्रॅव्हिस नावाच्या आजाराने ग्रासल्याचे दिसून आले.

त्यांनी सांगितले की या आजारामुळे त्यांची प्रकृती इतकी बिघडली होती की त्यांना चालताही येत नव्हते आणि बोलताही येत नव्हते. इतकंच नाही तर बोलण्यात आणि चालण्यात त्रास होण्यासोबतच त्यांना डोळे बंदही करता येत नव्हते. मनमोहन देसाई यांनी त्यांना या कठीण काळात खूप साथ दिली आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांना खूप धीर आला.

अमिताभ बच्चन यांच्या आधी अभिनेता-दिग्दर्शक टीनू आनंद यांनीही त्यांच्या आजाराविषयी सांगितले होते. ते म्हणाले होते की, बिग बींना या आजाराची माहिती ते मर्द या चित्रपटाचे शूटिंग करत असताना दिली होती. आणि त्यानंतर ते शहेनशाहच्या शूटिंगसाठी जाणार होते.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कद्दू के उपयोगी घरेलू नुस्ख़े (Useful home remedies of pumpkin)

कद्दू में विटामिन ए, सी व ई के साथ-साथ फाइबर, पोटैशियम, बीटा-कैरोटीन पाए जाते हैं,…

July 5, 2025

काजोल- यहां हर‌ फ़ैसला एक कुर्बानी है… (Kajol- Yahaan har faisla ek kurbani hai…)

- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…

July 5, 2025

पुरुषों के इन हेल्थ सिग्नल्स को न करें नज़रअंदाज़ (Men’s health: Critical symptoms that should never be ignored)

पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…

July 5, 2025
© Merisaheli