FILM Marathi

आता मला लग्न करायचे आहे अन्… गोविंदाची भाची रागिणी खन्नाने व्यक्त केली इच्छा (Govinda’s Niece Ragini Khanna is planning to get Married)

टीव्हीवरील हिट शो ‘ससुराल गेंदा फूल’ मधील आपल्या अभिनयामुळे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री रागिणी खन्ना बऱ्याच दिवसांपासून छोट्या पडद्यावरुन गायब आहे. 2012 मध्ये या मालिकेद्वारे प्रत्येक घराघरात लोकप्रियता मिळवल्यानंतर अभिनेत्रीअचानक छोट्या पडद्यापासून दुरावली, परंतु आता बातमी अशी आहे की अभिनेत्रीला लग्न करून सेटल व्हायचे आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड हिरो नंबर वन गोविंदाची भाची रागिनी खन्ना हिने छोट्या पडद्यापासून दूर राहण्याचे खरे कारण सांगितले.ती लग्न करून सेटल होण्याचा विचार करत आहे.

एका एंटरटेन्मेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाची भाची रागिणी खन्ना हिने तिच्या लग्नाबद्दल आणि त्यासंबंधीच्या योजनांबद्दल सविस्तरपणे सांगितले. अभिनेत्रीने सांगितले की ती नवरी बनण्यास तयार आहे, ती फक्त एका चांगल्या वराची वाट पाहत आहे. आई तिच्यासाठी चांगले स्थळ शोधण्यात व्यस्त आहे.

अभिनेत्रीने सांगितले की तिच्या आईने घराला मॅरेज ब्युरोमध्ये बदलले आहे. माझे लग्न लवकर व्हावे म्हणून ती रोज चांगले स्थळ शोधत असते. यासोबतच रागिणी म्हणाली की, मला वाटतं हीच योग्य वेळ आहे की मी लग्न करावं. आता मी लग्न करून सेटल व्हावे, मला आशा आहे की हे लवकर होईल. मला हा किंवा तो जोडीदार हवा आहे अशी कोणतीही लांबलचक यादी माझ्याकडे नाही.

पुढे मुलाखतीत रागिनी म्हणाली की, माझा भावी जीवनसाथी मुंबईचा असावा, कारण मी इंडस्ट्रीत खूप मेहनत केली आहे आणि भविष्यातही शोबिझमध्ये काम करत राहण्याची माझी इच्छा आहे. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, तिने जवळजवळ एक दशकापासून तिच्या करिअरला नेहमीच प्रथम प्राधान्य दिले, परंतु आता तिला स्वतःवर लक्ष केंद्रित करायचे आहे.

रागिणी खन्ना इतक्या वर्षांपासून छोट्या पडद्यापासून का गायब आहे? याबाबत अभिनेत्रीने खुलासा केला की, ती ‘ससुराल गेंदा फूल’ या मालिकेत काम करत असताना तिची तब्येत बिघडू लागली होती. हळूहळू तिची तब्येत इतकी खालावली की तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. तब्येत बिघडल्यामुळे तिने छोट्या पडद्यापासून दूर राहणेच योग्य समजले आणि चित्रपटांकडे मोर्चा वळवला.

उल्लेखनीय आहे की, मुलाखतीत रागिणीने असेही सांगितले की, तिला छोट्या पडद्यावर काम करणे थांबवायचे नाही, कारण टीव्हीच्या माध्यमातूनच तिला प्रेक्षकांमध्ये ओळख मिळाली आहे. आज ती जे काही आहे किंवा आज ज्या स्थानावर आहे, ते सर्व टीव्हीमुळेच आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

आपके मोबाइल की बैटरी की सबसे ज़्यादा खपत करते हैं ये ऐप्स (These Apps Drain Your Phone’s Battery the Most)

आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…

July 2, 2025
© Merisaheli