FILM Marathi

ते २० वर्षांपूर्वीच आमच्या कुटुंबापासून वेगळे झालेले… रवींद्र महाजनींच्या मृत्यूनंतर १ महिन्याने गश्मीर महाजनीने सांगितलं सत्य (‘He Was Separated From Our Family Since Last 20 Years’ Gashmir Mahajani Reveals The Truth About Ravindra Mahajani After A Month His Death)

लोकप्रिय मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीने काही दिवसांपूर्वी आपल्या वडिलांना गमावले. गश्मीर महाजनीचे वडील रवींद्र महाजनी त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले. वडिलांच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी अभिनेत्याला त्यांच्या मृत्यू झाल्याचे समजले. ही बातमी समोर आल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर अभिनेत्याला प्रचंड ट्रोल केले. आता अभिनेत्याने या प्रकरणावर मौन तोडले आणि दोन दिवसांनी हे का कळले ते सांगितले.

गश्मीरचे वडील वेगळ्या फ्लॅटमध्ये राहत होते. त्यांचा कुटुंबाशी काहीही संबंध नव्हता. फ्लॅटमधून दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले होते. पोलिसांनी दरवाजा तोडला असता गश्मीरच्या वडिलांचा मृतदेह आढळून आला. गश्मीरला सोशल मीडियावर ट्रोल केले जाऊ लागले की त्याने वडिलांची काळजी घेतली नाही. म्हणूनच मृत्यूनंतर दोन दिवसही या अभिनेत्याला कळले नाही. या प्रकरणी अभिनेत्याने सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली होती. आता या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्याने ETimes दिलेल्या मुलाखतीत वडिलांच्या मृत्यूबद्दल त्याला का माहित नव्हते याचे खरे कारण सांगितले.

अभिनेत्याने सांगितले की तो 20 वर्षांपासून वडिलांपासून वेगळा राहत होता. वडिलांनी स्वतःच्या इच्छेने त्यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. गश्मीरने सांगितले की, ‘सोशल मीडियावर माझ्या आणि माझ्या कुटुंबाविषयी जे काही बोलले जात होते ते मी वाचत होतो. या गोष्टींचा मला काही काळ त्रास झाला नाही, पण काही लोक माझ्या पाठीशी उभे राहिले. माझे वडील परिपूर्ण नव्हते. कुणीही परिपूर्ण नाही.

वडिलांनी स्वतः वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता

गश्मीर पुढे म्हणाला की, ‘मी माझ्या वडिलांना एका छोट्या घरात सोडले आहे आणि मी लक्झरी लाइफ जगत आहे असे काही लोकांना वाटत होते, पण तसे नव्हते. त्यांनी स्वतःच वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता आणि तोही २० वर्षांपूर्वी. एक कुटुंब म्हणून आम्ही काहीही करू शकलो नाही, आम्ही त्यांचे वेगळे होणे स्वीकारले कारण कोणावरही कुणासोबत राहण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही. त्यांना पाहिजे तेव्हा ते आमच्याकडे रहायला यायचे, पण त्यांच्या मनाप्रमाणे जायचे. माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ते बराच काळ आमच्यासोबत राहिले. ते मूडी होते, ते स्वतःची कामे स्वत: करत असे. या कारणास्तव, जेव्हा केअर टेकर ठेवली जायची तेव्हा ते एक-दोन दिवसांत त्याला काढून टाकत असत.

गश्मीर पुढे म्हणाला की, ‘गेल्या तीन वर्षांत त्यांनी स्वतःला सगळ्यांपासून, अगदी त्यांच्या कुटुंबापासूनही दूर केलं होतं. शेजाऱ्यांशी बोलणारे किंवा मित्रांसोबत मॉर्निंग वॉक करायला जाणारे ते नव्हते. आम्हाला त्यांच्या मृत्यूची माहिती उशिरा कळण्याचे हे देखील एक मोठे कारण होते. मला यापेक्षा अधिक काही स्पष्ट करायचे नाही, कारण मी जे काही बोललो त्याचा गैरसमज होईल. मी आता समाधानी आहे.’ वडिलांसोबतच्या नात्याबद्दल बोलताना गश्मीर म्हणाला, ‘अनेक कारणं होती, ज्यांमुळे नातं खराब होतं, पण ते माझ्या आईचे पती आणि माझे वडील होते. त्यात अनेक अतिशय खोल वैयक्तिक गोष्टी आहेत. अनेक सखोल कौटुंबिक रहस्ये सार्वजनिकपणे बाहेर काढली जाऊ शकत नाहीत. ते इंडस्ट्रीतील सर्वात देखण्या अभिनेत्यांपैकी एक होते, ज्यांचे हास्य खूपच सुंदर होते. मला एवढेच लक्षात ठेवायचे आहे.’

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

सोबत क्षणांची नाही तर कायमची आहे… (Togetherness Is Not For Moments But Forever…)

दत्तक मूल आणि पालक यांच्यातील नातं हे भावनिक असतं. ते तितक्याच पावित्र्यानं अन् संवेदनशीलतेनं सांभाळता…

April 19, 2024

किरण मानेंनी व्यक्त केल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरां प्रति भावना ( Kiran Mane Share His Feeling For Dr. Baba Saheb Ambedkar )

बौद्ध धम्म स्विकारताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक पत्रक काढलंवतं, ज्यात त्यांनी तुकोबारायाच्या गाथेतल्या एका अभंगातली…

April 19, 2024

अक्षम्य (Short Story: Ashamya)

अर्चना पाटील मी केला तो व्यभिचार, तर मग अर्जुनने नवरा म्हणून ज्या गोष्टी केल्या, त्या…

April 19, 2024
© Merisaheli