रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या टीव्ही मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी यांनी 22 जानेवारी हा भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे. याच दिवशी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल आणि दीपिका चिखलियासोबत ते देखील अयोध्येत पोहोचले होते. आता त्यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांनी स्वतः राम मंदिर प्राणप्रतिष्ठेत मिळालेल्या प्रसादात काय होते आणि ते त्याचे काय करणार याबद्दल सांगितले.
सुनील लहरी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि सर्वांना राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला काय प्रसाद मिळाला हे दाखवले. आधी त्यानी स्टीलचा डबा दाखवला ज्यात बेसनाचे लाडू होते. त्यानंतर एका बॉक्समध्ये तुळशीमाळ, रुद्राक्ष, शबरी मनुका, कुमकुम, केशर, दिया, गंगाजल असल्याचे दाखवले. याशिवाय मिठाईचा एक मोठा डबाही होता.
त्यानंतर सुनील लहरी यांनी त्या प्रसादाचे काय करणार हे सांगितले. ते म्हणाले की मी तो जास्तीत जास्त लोकांमध्ये वितरित करू कारण प्रत्येकाला प्राण प्रतिष्ठाला जायचे होते परंतु ते शक्य होऊ शकले नाही. इतर लोकांनीही असेच करावे, असेही ते म्हणाले.
यापूर्वी सुनील लहरी यांनी सांगितले होते की, तीन दशकांपूर्वी जेव्हा ते पहिल्यांदा अयोध्येला गेले होते तेव्हा त्यांनी एका तंबूत रामाची मूर्ती पाहिली आणि त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी मुलाखतीत सांगितले होते, ‘मी स्वतःला म्हणालो, ही जागा बघ, येथे भगवान रामाचा जन्म झाला होता आणि आता त्यांना अशा ठिकाणी ठेवण्यात आले आहे. ते खूप दयनीय होते. मला वाटतं, काळाबरोबर न्याय योग्य दिशेने गेला आहे.
कल अलमारी साफ करते-करते रुचिका फाइल्स भी ठीक करने में लग गई. जब से बेटे…
उर्फी जावेद को सिर्फ़ भारत में ही नहीं, विदेशों में भी अच्छी-ख़ासी पहचान मिल चुकी…
न जाने क्यों, मुझे तो पूरा यक़ीन है कि लगातार काली उड़द के दान के चलते ही…
आयुष्य जेव्हा रंगीत असतं, तेव्हा प्रेमात आलेला विरह म्हणजे अपघाताने कॅनवासवर पडलेला काळा रंग. अशा…
गेल्या काही दिवसांपासून जान्हवी आणि राजकुमारच्या 'माही' या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. आता या…
करीना कपूर खान अपने काम में चाहे कितनी भी व्यस्त क्यों न हो, लेकिन अपने…