Close

गणेशोत्सवात घरांची सुरक्षा (Home Safety Tips In Ganeshotsav)

महाराष्ट्राला उत्सव, सणांची परंपरा आहे. लोक एकत्र येण्यासाठी उत्सव फार महत्त्वाचे असतात. घराघरात गणेशदर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. मात्र, उत्सवाच्या वेळी जेवढे आनंदाचे वातावरण असते तेवढेच सतर्क देखील राहावे लागते. समाजकंटकांपासून अनेकदा धोका होऊ शकतो. सार्वजनिक गणेशमंडळांच्या ठिकाणी चोरी झाल्याच्या घटना आपण ऐकतो, वाचतो. याचाच त्रास आपल्या निकटवर्तीयांना होऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे असते.

ही काळजी घेण्यासाठी एकच नाव समोर येते ते म्हणजे गोदरेज. अनेक ठिकाणी गोदरेज हे आपल्या घराचे सुरक्षारक्षक म्हणूनच कार्यरत असतात. तुमचे सणवार उत्साहात जावेत आणि त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे सुरक्षित जावेत यासाठी गोदरेज लॉक्सने काही टिप्स आपल्याला दिल्या आहेत. 

सुरक्षेचे उपाय

गणेशोत्सवात अनेकविध पद्धतींनी घर सजवले जाते. यासाठी लायटिंगचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र यासाठीचे वायरिंग सुरक्षित आहे की नाही, हे पाहून घ्यायला हवे. थोडी हलगर्जी देखील शॉर्टसर्किटला कारण ठरू शकते. तसेच याच्या आसपास कुठेही पडदे किंवा कागद असू नयेत, जे लगेच पेट घेऊ शकतात. घरातील सुरक्षेप्रमाणेच घराबाहेरील सुरक्षेकडेही लक्ष असावे. बाहेरही लायटिंग असल्यास मुले, वृद्ध त्याच्या जास्त जवळ जाणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. या उपायांमुळे तुमचे उत्सव नक्कीच सुरक्षित वातावरणात पार पडू शकतात.

मुले तसेच वृद्धांची काळजी घेण्यासाठी माणूस  सणासुदीच्या काळात काम असल्याने म्हणा किंवा घरी पाहुणे असल्याने मुलांकडे तसेच वृद्धांकडे दुरस होऊ शकते. अशा वेळी त्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी एखाद्या व्यक्तीला सांगून ठेवा. ते ज्या खोलीत असतील, तिथे सगळी व्यवस्था आहे ना, याची काळजी घ्या. खरंतर  अशावेळी त्यांच्या खोलीला ऍडव्हान्स लॉक असणे केव्हाही चांगले. कारण अशी लॉकही कुठूनही ऑपरेट करता येतात. आणि आपले कुटुंब सुरक्षितही राहते. यात सेफ्टी अलर्ट हातात, रिमोट ऍक्सेस असतो, जो आपल्याला अत्यंत उपयोगी ठरू शकतो. हा एक विश्वासार्ह पर्याय नक्कीच ठरू शकतो.

कोणत्याही घराची सुरक्षितता ही त्याला लावलेल्या कुलुपांमध्ये असते, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. घरातल्या माणसांच्या सतर्कतेसोबतच ही यंत्रणा अद्ययावत असणे फार गरजेचे असते. त्यामुळेच उत्सवांच्या काळात सुरक्षा उपाय जास्त सक्षम असणे आवश्यक असते. सणांच्या काळात घरात खूप धावपळ असते, गर्दी असते, अशावेळी सुरक्षा अत्यंत पक्की असणे फार आवश्यक असते.

Share this article