सध्या सर्वत्र अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिच्या वक्तव्याची चर्चा होत आहे. अलिकडे बच्चन कुटुंब कायम काही ना काही कारणामुळे चर्चेत असतंच. आता देखील नव्या नवेली नंदा हिच्यामुळे बच्चन कुटुंबाच्या चर्चा रंगत आहेत. नव्या फक्त अमिताभ बच्चन यांची नात म्हणून लोकप्रिय नाहीतर, ‘व्हाट द हेल नव्या’ या तिच्या पॉडकास्ट शोमुळे देखील नव्या चर्चेत असते.
नव्याच्या शोच्या पहिल्या सिझनमध्ये नव्याने आजी जया बच्चन आणि आई श्वेता बच्चन, नंदा यांच्यासोबत अनेक विषयांवर गप्पा मारल्या आहेत. त्यानंतर तिचा दुसरा सिझन भाऊ अगस्त्य नंदा याच्यामुळे चर्चेत आला. आता नव्या तिसऱ्या सिझनमध्ये कोणाला बोलवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नव्याने सिझनमध्ये ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन यांना बोलवावं अशी चाहत्यांची इच्छा आहे. यावर नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नव्या हिने मोठं वक्तव्य केलं आहे.
मुलाखतीत नव्या हिला ‘शोमध्ये आजोबा, मामा-मामी यांना कधी बोलावणार?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नव्या म्हणाली, ‘नाही… मला नाही वाटत की ‘व्हाट द हेल नव्या’ शोचा तिसरा सिझन आल्यास मी कुटुंबातील लोकांना बोलवेल.’ नव्या हिच्या अशा उत्तरानंतर चाहत्यांमध्ये निराशेचं वातावरण निर्माण झालं आहे.
नव्या म्हणाली, ‘इतर क्षेत्रातील व्यक्ती माझ्या शोमध्ये आल्यानंतर मला आनंद होईल…मी क्रिकेटर दिप्ती शर्मा हिची फार मोठी फॅन आहे. ती अविश्वसनीय आहे आणि माझ्या शोमध्ये दिप्तीला बोलवायला मला आवडेल…’ असं देखील नव्या म्हणाली. तिच्या या वक्तव्यानंतर सर्वत्र फक्त आणि फक्त याचीच चर्चा रंगली आहे.
नव्या नवेली हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, श्वेता बच्चन आणि निखील नंदा यांची ती मुलगी आहे. कुटुंब फिल्म इंडस्ट्रीमधील असलं तरी, नव्या हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला नाही. नव्या हिने वयाच्या २१ व्या वर्षी उद्योजिका होण्याचा निर्णय घेतला.
नव्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत नव्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सौंदर्याच्या बाबतही नव्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर नव्या हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नव्या हिची चर्चा रंगली आहे.